About Me

My photo
क्षणा क्षणा नि "ज्ञान" आणि कणा कणा नि धन जोडता येते या उक्तीवर सार्थ विश्वास असणाऱ्या माणसानी तयार केलेला ब्लॉग

Friday, August 13, 2010

" ज्ञान "

ज्ञान म्हणजे काय ?
आदर्श मराठी कोश या बद्दल सांगतो कि " एखाद्या विषयाचे आकलन करण्याचे सामर्थ्य "

ज्ञान साधनेच्या कार्यात एकून तीन गोष्टींचा अंतर्भाव होतो
१) प्रज्ञा :ज्ञान ग्रहण  करण्याची शक्ती
२)मेधा : ज्ञान धारण करण्याची शक्ती
३)प्रतिभा : नव नवीन कल्पना सुचण्याची शक्ती

या तीनही गोष्टी व्यक्ती सापेक्ष असतात.

आपण बर्याचदा बुद्धी आणि ज्ञान याची गल्लत करतो

बुद्धी हि प्रज्ञा आणि मेधा यांच्या सहकार्याने कार्य करते तर ज्ञाना साठी केवळ प्रतिभेची गरज असते.

प्रत्येक ज्ञानी मनुष्य हा बुद्धिमान असतोच असे नाही तसेच बुद्धिमान मनुष्य हा  ज्ञानी असतोच असे नाही.

काही लोकांना असामान्य बुद्धिमात्तेची देणगी लाभलेली असते ती माणसे इतरांना योग्य मार्गावर आणून सोडायचे काम करतात. उदाहरण द्यायचे झाले तर स्वामी विवेकानंद , चिंतामणराव देशमुखांनी देशाची अर्थ व्यवस्था  घडवली हि माणसे एकदा वाचलेली गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवत.

तर काही लोक हे कष्ट घेउन आपल्यात कमी असलेली बुद्धिमत्तेची उणीव भरून काढतात याचे उदाहरण द्यायचे तर डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर ते २४ पैकी २१ तास अभ्यास करत त्यामुळे ४ वर्षे चालणारा अभ्यासक्रम त्यांनी २.५ वर्षात पूर्ण केला व याच बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी आपली राज्य घटना लिहिली.

बुद्धिमत्ता हि सर्वाना समप्रमाणात वाटलेली आहे पण आपली आवड व आपला एखाद्या विषयातील रस या गोष्टी वर आपण कोणत्या गोष्टीचे ज्ञानं आर्जीत करू शकतो ते ठरते.

समजा आपण गृहीत धरले कि देव हा बुद्धीची वाटणी करतो आहे तर तो दुजा भाव कशाला करेल त्याची नक्कीच अशी इच्छा नसणार कि काही लोकांनी बुद्धिमान बनावे व बाकीच्यांनी नांदी बैला सारख्या माना डोलवाव्यात.

त्यामुळे एक लक्षातघ्या कि आपण आपल्या कष्टांच्या जोरावर बुद्धि अर्जित करू शकतो व बुद्धीचा योग्य व सद्सद्विवेक वापर हा तुमची ज्ञानाची पातळी दर्शवतो.

आजच्या साठी एवढेच
याचवरचे वेगळे आयाम उद्या हाताळूयात तो पर्यंत

शुभ रजनी
अमित गावडे

1 comment:

  1. खूप छान आहे. असेच चालू दे! आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी धन्यवाद !!!

    ReplyDelete